आजपर्यंत, अगदी आत्तापर्यंत ही अखिल स्त्री जात, स्त्री वर किती अन्याय होत आहे, स्त्री किती बंदिवासात आहे, आपण त्याना किती कष्ट दिले आहेत वगैरे वगैरे म्हणून टाहो फोडत असते. अरे... आमचा कोणी विचार करणार आहे का नाही. कसला लिंगभेद? मला मान्य आहे की काही वर्षापूर्वीपर्यंत खरच स्त्री ही अबला, बंदीनी म्हणजे अलका कुबल टाइप होती... पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आणि मला सांगा लहानपणापासून आपल्यावर ह्या स्त्री जातीमुळेकिती अन्याय झालाय. आमच्या शाळेत मास्तर आम्ही थोडी काही चुक केली की लगेच छडीने फोडून काढायचे आणि मूलीना नुसती वॉर्निंग देऊन सोडून द्यायचे. आणि समजा माझ्यासारख्या एखाद्या क्रांतीकारी मुलाने या अन्यायाविरुद्ध आवाज केला की आधी माझ्या कानाखाली दोन आवाज काढून मग मुलींच्या डोक्यात शाबासकीची थाप मारल्यासारखी चापट मारायचे. त्याचा मुलींवर तर काही परिणाम व्हायचा नाहीच पण त्यांच्या डोक्यातल्या दोन चार उवा मात्र मरत असतील. बर ते तर ते पुन्हा आम्ही मार खाताना ह्या मुली आमच्याकडे बघून दात काढायच्या... बर ह्या टाहो काय म्हणून फोडतात तर आम्हाला स्वातंत्र्य दिल जात नाही. आता अजुन कशाच स्वातंत्र द्यायच रहिलय तुम्हाला. स्त्री पुरूष समानता मानता ना तुम्ही ? मग आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला? नौकरी मागायला जा.. तिथही याना आरक्षण, बसमधे जा, रेल्वेत जा,मंदिरात जा, कुठही जा यांच्या साठी आरक्षित जागा आहेतच. बर एक काळ खरच असा होता की ह्यांच्याकड पाहून वाटायच की खरच ह्या मुली आहेत. पण आजकालच्या मुलींकडे पाहून खरच वाटत का की ह्यांच्यावर एखादी कविता करावी, ह्यांचावर मनापासून प्रेम कराव... सर्वस्व विसरून प्रेम करनारी मूल आज खूप आहेत पण एकाच मुलावर विशुद्ध प्रेम करनारी मुलगी एखादीच. लता मंगेशकर, किरण बेदी, राजमाता जिजाउ यांचा आदर्श सांगितला की ह्याना तो साचा वाटतो. कारण मल्लिका शेरावत, राखी सावंत ही त्यांची प्रेरणास्थान.
बर एक आदर्श पुरूष घडवणारी स्त्रिच असते ना? समाज घडवणारी स्त्रिच असते ना? आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी तीचीच ना? मग आजचा जो भ्रष्ट समाज आहे तो घडवला कुणी?
आज देशाची अवस्था इतकी वाईट असताना का नाही एखादा शिवाजी घडत? पहिले शिवाजी राजे याच मराठी मातीत जन्मले ना? पण शिवाजी घडायला जिजामाता लागतात. त्या काळात तितक्या प्रतिकूल परिस्थीत शिवाजी घडवणार्या जिजाउ पण एक स्त्रिच होत्या ना? मग आज तर तुम्हाला एवढे अधिकार दिलेत. एवढ शिक्षण दिल जातय. मग नेमक काय कमी पडतय तुम्हाला?
रामायण घडल ते एका स्त्रीमूळेच.. महाभारत घडवणारी पण एक स्त्रिच होती..... आणि शिवबा घडवणारी पण एक स्त्रिच होती. आणि आजचा हा समाज घडवलाय तो पण स्त्रीनेच. स्त्रीयानो दिलेल्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग करा. पश्चिमात्यांनी चघळुण फेकलेल्या गोष्टींच अनुकरण करताना आपण भारतीय आहोत हे विसरू नका.....
बर एक आदर्श पुरूष घडवणारी स्त्रिच असते ना? समाज घडवणारी स्त्रिच असते ना? आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी तीचीच ना? मग आजचा जो भ्रष्ट समाज आहे तो घडवला कुणी?
आज देशाची अवस्था इतकी वाईट असताना का नाही एखादा शिवाजी घडत? पहिले शिवाजी राजे याच मराठी मातीत जन्मले ना? पण शिवाजी घडायला जिजामाता लागतात. त्या काळात तितक्या प्रतिकूल परिस्थीत शिवाजी घडवणार्या जिजाउ पण एक स्त्रिच होत्या ना? मग आज तर तुम्हाला एवढे अधिकार दिलेत. एवढ शिक्षण दिल जातय. मग नेमक काय कमी पडतय तुम्हाला?
रामायण घडल ते एका स्त्रीमूळेच.. महाभारत घडवणारी पण एक स्त्रिच होती..... आणि शिवबा घडवणारी पण एक स्त्रिच होती. आणि आजचा हा समाज घडवलाय तो पण स्त्रीनेच. स्त्रीयानो दिलेल्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग करा. पश्चिमात्यांनी चघळुण फेकलेल्या गोष्टींच अनुकरण करताना आपण भारतीय आहोत हे विसरू नका.....